५०० व १००० रुपयांच्या नोटांवरुन मनमाड रेल्वे स्थानकावर गोंधळ

Lokmat 2021-09-13

Views 0

नाशिक - ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याच्या निर्णयामुळे मनमाड रेल्वे स्थानकावर गोंधळाचे वातावरण तयार झाले. रेल्वे बुकिंग कार्यालयामध्ये या नोटा स्वीकारल्या जात असल्यातरी प्रवाशाला परत देण्यासाठी सुट्टे पैसे नसल्याने ग्राहक वाद घालत असल्याचे पाहावयास मिळत होते. कमी अंतराच्या तिकिटासाठी सुद्धा प्रवाशी 500 व हजाराच्या नोटा देत असल्याने गोंधळात वाढ झाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे, तरी प्रवाशांनी वाद न घालता सामंजस्याची भूमिका घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन मुख्य वाणिज्य निरीक्षक अनिल बागले यांनी केले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS