'अजित पवार म्हणजे एक कर्तबगार, संवेदनशील, सामाजिक हित जाणणारा नेता'; राजेश टोपे यांनी व्यक्त केल्या भावना

ETVBHARAT 2026-01-28

Views 19

जालना : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर माजी मंत्री राजेश टोपे भावुक झाले.   जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्यासाठी अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर होते. अजित पवार यांच्या निधनानंतर माजी मंत्री राजेश टोपे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "अजित पवारांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. या दुर्दैवी घटनेनं महाराष्ट्राची अपरिमितहानी झाली आहे. अजित पवार म्हणजे एक कर्तबगार नेता, संवेदनशील नेता, सामाजिक हित जाणणारा नेता, संघटन कौशल्य असणारा नेता, शिस्तप्रिय नेता, वक्तशील नेता होते. तसंच सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला नेता म्हणून अजित दादांची ओळख होती. अजित दादा म्हणजे जे बोलेल ते करणारा नेता अशी त्यांची ओळख होती."

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS