गुळाने तारलं, शेतकरी भावांनी अडीच एकरात सहा लाखांचं उत्पन्न घेतलं

Maharashtra Times 2022-01-28

Views 26

साखरेप्रमाणे गुळाला हमीभाव नसल्याने सध्या गुऱ्हाळ चालकांपुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. गुळाची मागणी आणि दराअभावी होणारी फरफट लक्षात घेता उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुर तालुक्यातील देवसिंगा येथील दोघा शेतकरी भावांनी ऊसाचं गुऱ्हाळ तयार केलंय. ज्या ठिकाणी उसाचा रस काढून त्याचा गूळ तयार करतात त्या जागेस 'गुऱ्हाळ' असे म्हणतात. शेतकरी भावांनी अवघ्या अडीच ऊसाचं गुऱ्हाळ सुरु केलंय. 20 टण गुळ बनवून ७ ते ८ लाख रुपये उत्पन्न घेण्याचा या शेतकरी बंधुचा मानस आहे. या कामासाठी घरातल्याच ४ भावांसह घरातील महिलांनी हातभार लावला आहे. यामुळे मजुरीसाठी लागणारा खर्च देखील वाचल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. ऊसासह इतर खर्च वगळता यातून त्यांना ५ ते ६ लाख रुपयांचा नफा मिळेल अशी आशा आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS