राज्य सरकारने दीड वर्षांपासून मागासवर्गीय आयोग नेमला नाहीये, त्यांनी तो आधी नेमावा असं म्हणत ओबीसी आरक्षणाच्या निर्णयात केंद्राचा संबध काय ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला विचारला आहे. खासदार छत्रपती संभाजीराजेंनी राजीनामा देऊन कोणावर परिणाम होणार आहे? महाराष्ट्रातील सरकार कोडग सरकार आहे. असा टोला त्यांनी लगावला आहे. संभाजी राजेंवर हेरगिरीच्या विषयाचा निषेध करत त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.